LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

अळणगाव पुनर्वसनात सोयींचा अभाव

भातकुली :- निम्न पेढी प्रकल्पातील नागरिकांचं पुनर्वसन दुसऱ्या जागी केलय मात्र तेथे सोयी नसल्याने नागरिकांनी स्थलांतर केली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सीईओ . संजिता महोपात्रा यांनी आज दी २४ रोजी पेढी प्रकल्पातील अळणगाव कुंड या दोन गावांची पाहणी केली त्यादरम्यान त्यांना सुविधेचा अभाव जाणून आला नागरिकांनी आपल्या तक्रारीही यावेळी मांडल्या

निम्न पेढी प्रकल्पातील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यातच स्थलांतराचा अल्टिमेटम दिला. व संबधित अधिकारी यांना निर्देश दीलेमात्र नागरिक पुनर्वसनात स्थलांतरित झाले नाही .या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता महोपात्रा यांनी आज दी २४ रोजी पेढी प्रकल्पातील अळणगाव कुंड या दोन गावांची पाहणी केली त्यादरम्यान त्यांना सुविधेचा अभाव जाणून आला.व नंतर त्यांनी गावातील सरपंच गौतम खंडारे यांच्यासोबत नागरिक सुविधा बद्दल चर्चा केली . अळणगाव पुनर्वसन येथील नागरिकांनी अमरावती पंचायत समिती येथील घरकुल विभागातील महिला डाटा एंट्री ऑपरेटर घरकुल मधील टप्या ट प्या जे लाभार्थ्याला पैसे मिळत त्या करिता डाटा एंट्री ऑपरेटर पैसे घेत आहे अशी तक्रार सीईओंकडे केली

नद्यांवरती प्रकल्प उभे राहिले त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांची जमीन अधिगृहीत केली..मात्र जेथे पुनर्वसन झालं तेथे सोयीचं अभाव असल्याने नागरिक स्थलांतरित झाले नाही या प्रकरणी नागरिकांची गळचेपी होतेय शासन नोटीस बजावतंय तर इकडे सोयीचं नाहीत या तेथील नागरिकांनी सीईओ संजीत मोहपात्रा यांच्याकडे तक्रारी केल्यात. ताज्या बातम्यांसाठी पहात राहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!