AmravatiLatest News
सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्री शक्तीचा सन्मान — डॉ.अर्चना हनवंते

समाजामध्ये स्त्रियांचा आदर व त्यांची प्रतिष्ठा राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. यामुळे सामजिक एकात्मता निर्माण होण्यास मदत होईल. सावित्रीबार्इंनी स्त्रियांच्या विकासाकरिता दिलेला लढा, त्यांच्याविषयीचे कार्य हे खरोखरच आदर्शवादी स्वरूपाचे आहे. त्यांच्या या कार्याची यशस्वीता म्हणून आज प्रत्येक क्षेत्रातील महिलांना समान वागणूक आणि प्रतिष्ठेचे स्थान मिळाले असून सर्वच क्षेत्रामध्ये महिला आज आहेत. स्त्रियांच्या हक्कासाठी सावित्रीबाईंनी दिलेल्ेा योगदान हे आजच्या युगातील महिलांसाठी प्रेरणादायी व सन्मानाचे असल्याचे मत डॉ. अर्चना हनवंते यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी जात, लिंग भेदभाव, अन्याया विरुध्द लढा दिला. प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी महिलांसाठी शैक्षणिक कार्य केले. महिलांना विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सावित्रीबाईंमुळे प्राप्त झाला असून सावित्रीबार्इंचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार समाजामध्ये व्हावा, अशी अपेक्षा याप्रसंगी डॉ. हनवंते यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, समाजामध्ये सकारात्मक बदल निर्माण करण्यासाठी अशा थोर महापुरुषांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थी व समाजातील प्रत्येक घटकांनी घ्यावा, जेणेकरून सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा मिळण्यास मदत होईल. विभागामध्ये विविध थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून विद्याथ्र्यांमध्ये मूल्य, संस्कार तसेच विनम्रता निर्माण करण्यास मदत होते. विद्याथ्र्यांनी नेहमी समाजभिमुख राहून समाज विकासाच्या अनुषंगाने योगदान द्यावे. सूत्रसंचालन प्रा. प्रियंका तायडे, तर आभार प्रा. शिवानी अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.