LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

“मालेगावला व्होट जिहादसाठी बदनाम करणं थांबवा – खासदार शोभा बच्छाव यांचा भाजपा नेत्यांना सडेतोड इशारा”

मालेगाव व्होट जिहाद केंद्र असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आरोप चुकीचा आहे.मालेगावमध्ये ऑक्टोंबरमध्ये 115 कोटी रुपये आले आणि लगेच काढली ही गेले तेव्हा लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या .या प्रकाराची सीबीआयमार्फत सखोल चौकशी जनतेसमोर सत्य आणावे. विनाकारण मालेगावची बदनामी करू नये असे प्रतिपादन धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार शोभा बच्छाव यांनी मालेगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.मालेगावचे नागरिक सुज्ञ आहेत. बांगलादेशी व रोहिंग यांना ते स्थान देणार नाहीत.भाजपाने देशात 400 चा नारा दिला होता मात्र 240 वरच थांबले.विनाकारण मालेगाव बदनामी करण्याचे काम सुरू आहे.देशात हिंदू दलित आणि अल्पसंख्यांक यांना देखील बदनाम केले जात आहे…
-हे सर्व घटक महाविकास आघाडी आणि धर्मनिरपेक्ष विचारासोबत राहिले आहे. लोकसभेला देखील मुस्लिम बांधव महाविकास आघाडी बरोबर होते.मालेगाव मध्य मध्ये भाजपाला गेल्या चार लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यास भाजपाला 6000 पेक्षा जास्त मतदान मिळाले नाही. मलाही एक लाख 98 हजार मतदान हे मालेगाव मध्य मध्ये मिळाल्याचे मला अभिमान आहे.मालेगाव सहित हिंदू मतदार संघामध्ये देखील काँग्रेसच्या मताधिक्यात वाढ झाली आहे..

  • लोकसंख्या वाढली आणि मतदार वाढले त्याचा हा परिणाम आहे.त्यामुळे व्होट जिहाद, लँड जिहाद हे भाजपाचे शब्द आहेत.तसे काहीही नाही.असेही खासदार शोभा बच्छाव म्हणाले.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!