किरीट सोमय्याच्या व्यक्तव्यानंतर अंजनगाव तहसीलदाराचे स्पष्टीकरण

मालेगावात भाजप नेता किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी असल्याचे आणि त्यांना रहिवासी दाखले दिले असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर अंजनगावात यासंबंधी cid कडून चौकशी करण्यात आली, यांच्या वक्तव्याचे खंडन करत अंजनगावच्या तहसीलदार पुष्पा धाबेराव सोळंके यांनी स्पष्ट केले की, मालेगावात बांगलादेशी असतील मात्र अंजनगात बांगलादेशी नाहीत या गोष्टीची आम्ही कसून चौकशी केली आहे. रहिवासी आदेश आम्ही अर्जांची आणि कागदपत्रांची पडताळणी करूनच दिले आहे. 569 अर्ज आत्तापर्यंत वाटप झाले आहेत, त्यात 485 मुस्लिम आणि 84 हिंदू अर्जांचा समावेश आहे, कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने अंदाजे एक हजाराच्या जवळपास अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. आम्ही आमचं काम नियमांमध्ये राहून, कोणताही गैरप्रकार न करता, खात्री करूनच केलेले आहे, असं स्पष्टीकरण अंजनगाव सुर्जिच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी माध्यमांशी बोलताना दिल…
देशात ठिकठिकाणी बांगलादेशी घुसले असून, खोटे कागदपत्र देऊन ते रहिवासी दाखले मिळवत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी ठिकठिकाणी बांगलादेशी असल्याची आणि त्यांना रहिवासी दाखले स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याचे वक्तव्य केले होते. सोमय्या यांच्या वक्तव्याच खंडन अंजनगावच्या तहसीलदार यांनी केले आहे.