LIVE STREAM

Uncategorized

राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची जोरदार धडक अन् सारं संपलं,बीडमध्ये पुन्हा एका सरपंचाचा मृत्यू,

बीड (परळी): बीडमध्ये पुन्हा एकदा एका सरपंचाला आपला जीव गमवावा लागला आहे. येथे एका सरपंचाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत परळी तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टिप्पर चालकाला अटक करण्यात आली आहे.
परळी तालुक्यातील निरवट येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होताी की यामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला. यामुळे पुन्हा एकदा परळी मधील अवैध राख वाहतुकीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
बीडच्या परळीत मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात परळी तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावरुन जात असताना अभिमन्यू क्षीरसागर यांच्य दुचाकीला या टिप्परने धडक दिली. त्यामुळे संरपंच हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदना येथे त्यांच्या गावाकडे शेतातली कामे उरकून ते परळीच्या दिशेने जात होते. यादरम्यान, रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मिरवट फाट्यावर त्यांच्या दुचाकीला राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. या टिप्परने सरपंचाला उडवल्याने ते गंभीर जखमी झाले. यातच त्यांचा मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता यामध्ये दुचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीचा पूर्णपणे चंदामेंदा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. त्यानंतर बीडमध्येच पुन्हा एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!