LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे रिक्षा चालकाच्या शाब्दिक वादातून खून, तीन आरोपींवर गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे दोन रिक्षा चालकांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. याच शाब्दिक वादातून तिघांनी मिळून एका रिक्षा चालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राजेंद्र मुंगसे असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांनी तिघाही आरोपींना अटक केली आहे. सोमेश अशोक सरोडे (वय २७, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे), दिपक राजू साठे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे) आणि ज्ञानेश्वर कांतीलाल डूकळे (वय १९, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे) अशी या तीन आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी अनल राजेंद्र मुंगसे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे रिक्षा चालक राजेंद्र मुंगसे हे चालले होते. त्यावेळी पाठी मागून आलेल्या एका रिक्षा चालकाशी त्यांचे शाब्दिक वाद झाले. त्यावेळी समोरच्या रिक्षामध्ये असलेल्या चालकासाह दोघांनी मुंगसे यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र यांच्या डोक्याला बेदम मार लागला, त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राजेंद्र यांची हत्या केल्यानंतर तीनही आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता.
घटनेची माहिती मिळताचत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हत्येचा गुन्हा नोंद केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तपासाला सुरुवात केली. शिक्रापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला असता तपासादरम्यान एम एच १४ एल एस ०९१५ या रिक्षातील तिघांनी खून केल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांच्या टीमने पुण्यातील कुदळवाडी परिसरातून त्या रिक्षासह तीन आरोपींना ताब्यात घेतले. रिक्षाच्या वादातून झालेल्या शाब्दिक वादातून सदर रिक्षा चालकाचा खून केल्याचे त्यांनी कबूल केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!