LIVE STREAM

Latest NewsVidarbh Samachar

गेल्या दहा वर्षात जिल्हा नियोजन विकास समितीचा केवळ 16 टक्केच निधी खर्च

गेल्या दहा महिन्यात नियोजन विकास समितीचा केवळ 16. 91 टक्केच निधी खर्च झाल्याची बाब पार पडलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत उघडकीस आली। आता उर्वरित 83 टक्के निधी अवघ्या दोन महिन्यात खर्च करण्याचे दिव्य प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे।
तसेच खासदार आमदारांनी गुन्हेगारी व रेती तस्करीचा मुद्दा लावून धरला, रेती घाटावरून अवैधरित्या होणारा उपसा अश्या विषयावर जिल्हा नियोजनाची बैठक वादळी ठरली. दरम्यान बैठकीत आगामी आर्थिक वर्षासाठी 659 कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्ष खाली नियोजन समितीची बैठक पार पडली. जिल्ह्यातील सर्वच विभागांनी आपापले आराखडे तयार करून अधिकाधिक लोक कल्याणकारी कामे करावी असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!