लाडकी बहीण योजना :- कोण पात्र? कोण अपात्र? लाडकींच्या अर्जाची तपासणी पाच टप्प्यात; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

लाडकी बहीण योजना :- महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे महिलांच्या अर्जांची होणारी तपासणी. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. या योजनेतून जवळपास ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे.या महिलांना आतापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेत निकषांनुसार महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. ही पडताळणी पाच टप्प्यांमघ्ये होणार आहे. या योजनेत चारचाकी वाहनधारक महिलांची पडताळणी सुरु झाली आहे. त्यानंतर प्रत्येक टप्प्यानुसार महिला पात्र आहेत की नाही हे चेक केले जाणार आहे,
लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना नियमात न बसतानाही पैसे घेतले आहे. यामध्ये ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीही लाभ घेतले आहे. दरम्यान, ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न जर २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांचेही अर्ज बाद केले जाणार आहे. याची पडताळणी लवकरच सुरु केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी कशी होणार?
- एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक व्यक्ती लाभ घेत आहेत की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.
- बनावट कागदपत्रांद्वारे कोणी लाभ घेतला का? याची पडताळणी केली जाणार आहे.
- कुटुंबातील कोणाला निवृत्तीवेतन आहे की नाही याची पडताळणी केली जाणार.
- अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांची चौकशी केली जाणार आहे.
- आयकर विभागाच्या मदतीने ही चौकशी केली जाऊ शकते.
- पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांचेही अर्ज बाद केले जाणार आहे.
- यासाठी महिलांच्या घरी जाऊन तपासणी केली जाऊ शकते.