खासदार डॉ.अनिल बोंडेनी वाढवला मराठी सारस्वतांचा उत्साह

येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियमवर 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी (ता.२१) थाटात सुरुवात झाली. या संमेलनाच्या उद्घाटनिय कार्यक्रमाला राज्यसभेचे सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी उपस्थित राहून मराठी सारस्वतांचा, साहित्यिकांचा उत्साह वाढवला. दरम्यान त्यांनी ग्रंथ प्रदर्शनींना भेट देत विविध ग्रंथांची खरेदी केली. यासह पहिल्या दिवशीच्या साहित्य संमेलनातील विविध सत्रांनाही हजेरी लावली.
नवी दिल्लीच्या तालकटोरा येथील स्टेडियमवर 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे दिल्ली आयोजित या संमेलनाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांनी उद्घाटन केले. मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी वर्तमान अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्याकडे साहित्य क्षेत्राचे सूत्र सोपवली. या साहित्य संमेलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तीन दिवस होणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध प्रकारची सत्र आयोजित करण्यात आली आहे. साहित्यिकांसाठी विशेष पर्वणी आणि खास मेजवानी या माध्यमातून मिळत आहे. कला, क्रीडा, साहित्य, कृषी, अध्यात्म यासह विविध क्षेत्राची आवड असलेल्या राज्यसभा सदस्य डॉ.अनिल बोंडे यांनी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशीच्या उद्घाटनिय कार्यक्रमाला हजेरी लावली. दरम्यान विविध सभा मंडपात त्यांनी भेटी दिल्या. विशेष म्हणजे ग्रंथ प्रदर्शनीमध्ये असलेल्या विविध पुस्तकांच्या स्टॉलची त्यांनी पाहणी केली. दरम्यान त्यांनी पुस्तकांची खरेदी सुद्धा केली. यासह महाराष्ट्रातील मराठी जणांच्या या सोहळ्याला उपस्थित झालेल्या सारस्वतांचे, साहित्यिकांचे त्यांनी अभिनंदन करत उत्साह वाढवला.
__
‘माय मराठीचा जागर’ ही ऐतिहासिक पर्वणी – डॉ.अनिल बोंडे
अभिजात मराठी भाषेचा ऐतिहासिक महोत्सव राजधानी दिल्लीत होणे ही मराठी जणांसाठी, सारस्वतांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया दरम्यान खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी दिली. ते म्हणाले, जाणत्या जणांचा महाराष्ट्र अशी ओळख सांगताना ती राजधानी दिल्लीतही वृद्धिंगत होतं असल्याचे पाहून आनंद होतं आहे. अशा कार्यक्रमातून राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या साहित्यिकांची, कसदार साहित्याची निर्मिती होते. एकाप्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवासच असल्याचे त्यांनी सांगत महाराष्ट्रातील साहित्यिकांनी या संमेलनाला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.