LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

काँग्रेस आणि विकासाचा कुठलाही संबंध नाही – माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर

काँग्रेसचा आणि विकासाचा काहीही संबंध नाही! काँग्रेस पुढील २० वर्षे सत्तेत येऊ शकत नाही! अशा कठोर शब्दांत उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे! भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत काँग्रेसला पाय खेचणारा पक्ष म्हणून हिणवले! पाहूया सिटी न्यूजचा हा विशेष अहवाल!

उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे! त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काँग्रेस आणि विकासाचा कुठलाही संबंध नाही! देवसरकर म्हणाले, “काँग्रेस नेत्यांना फक्त एकमेकांची पाय खेचण्यात रस आहे! त्यामुळे राज्य आणि देशाच्या विकासाचा विचार त्यांच्या अजेंड्यावरच नाही! त्यांचे नेतृत्व कोसळले असून पुढील २० वर्षे काँग्रेस उभारी घेऊ शकणार नाही!”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुरदृष्टीचे नेतृत्व आहे! त्यांच्या धोरणांमुळे देश आणि राज्याचा झपाट्याने विकास होत आहे! त्यामुळेच आम्ही काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे!” असे देवसरकर म्हणाले. देवसरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे उमरखेडसह यवतमाळ जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसला धक्का बसला असून भाजपच्या ताकदीत वाढ झाल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे!

उमरखेडमधील माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे! काँग्रेसला भविष्यात सत्तेत यायचे असेल तर त्यांना नवी दिशा घ्यावी लागेल! आता पाहावे लागेल की, काँग्रेस या टीकेला काय उत्तर देते! पुढील घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!