LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

धारणी तालुक्यात राजवीर संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी, पालकमंत्री व पोलीस आयुक्तांना निवेदन सादर

धारणी तालुक्यात राजवीर संघटना आक्रमक झाली असून, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. पत्रकार रहमत खान उर्फ रम्मू यांच्याविरोधात हाजी इरफानने खोटी तक्रार दिल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे शहर अध्यक्ष आणि सचिव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. हाजी इरफान यांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात रहमत खानविरोधात ७ मार्च २०२५ रोजी तक्रार नोंदवली होती. संघटनेचा आरोप आहे की, विधानसभा निवडणुकीदरम्यान हाजी इरफान यांनी रहमत खान यांना हिंदू उमेदवार सुलभा खोडके यांच्या प्रचारातून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रहमत खान यांनी त्यास नकार दिल्याने सूडबुद्धीने ही तक्रार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. संघटनेने असा आरोपही केला आहे की, या प्रकरणात अमरावतीतील भू-माफियांचा हात आहे. या भू-माफियांनी धारणी तालुक्यातील सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून भूखंड विक्रीचा मोठा गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
“तर धारणी तालुक्यात राजवीर संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे प्रशासन काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तक्रारीची सखोल चौकशी होणार का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!