Crime NewsLatest NewsNagpur
नागपूर महल हिंसाचारानंतर कर्फ्यू लागू, कामठीतही पोलिसांचा अलर्ट!

नागपूर :- नागपूरच्या महल परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर शहरातील अनेक भागांत तणावाची परिस्थिती आहे. पोलिसांनी काही भागांत कर्फ्यू लागू केला आहे, तर कामठी शहर, जो अति संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो, तिथेही पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे. परिमंडळ क्रमांक 5 चे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी नागरिकांना शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. यासोबतच, पोलीस सोशल मीडियावरही नजर ठेवून आहेत.
पाहुयात सविस्तर वृत्त
सध्या नागपूर आणि कामठीमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अफवांपासून दूर राहा आणि अधिकृत माहितीची वाट पहा. पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत राहा.