LIVE STREAM

AmravatiLatest News

संसदमध्ये विद्याथ्र्यांना बोलण्याची संधी हा सुवर्णक्षण – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

अमरावती :- केंद्र सरकारच्या युवा कार्य व खेळ मंत्रालयाव्दारा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित अमरावती, अकोला, यवतमाळ व वाशिम जिल्ह्रांतील विद्याथ्र्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘विकसित भारत युथ पार्लमेंट – 2025’ मध्ये दीडशे विद्याथ्र्यांमधून दहा विद्याथ्र्यांची राज्यस्तरीय युथ पार्लमेंटकरिता निवड करण्यात आली आहे. या विद्याथ्र्यांमध्ये कु. श्रेया पाठक, कु. दिव्या विधाते, कु. श्रेया ठाकुर, कु. नफिसा हुसैन, कु. आयुषी ठाकुर व कु. पूर्वा मानकर सर्व अमरावती, कु. वैष्णवी राठोड व कु. कृतिका चौधरी, अकोला, यश चव्हाण व कु. गौरी काळमेघ, यवतमाळ या विद्याथ्र्यांचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय युथ पार्लमेंटच्या उद्घाटनप्रसंगी बोलतांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, भारताच्या संसदमध्ये विद्याथ्र्यांना बोलण्याची संधी मिळणे हा सुवर्णक्षण असून विद्याथ्र्यांनी आपले गांव, शहर, कुटुंब आणि आपल्या विद्यापीठाचा नावलौकीक करावा. युथ पार्लमेंट म्हणजे देशाचे भवितव्य म्हणून युवकांकडे पाहिले जाते. नेतृत्व घडविण्याचा या मागील उद्देश असून सन 2022 मध्ये देशभरातून 2 लाख विद्यार्थी युथ पार्लमेंटमध्ये सहभागी झाले होते. विद्याथ्र्यांनी आपल्या विद्यापीठासह आपले नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन देखील कुलगुरूंनी याप्रसंगी विद्याथ्र्यांना केले.

अमरावती, अकोला, यवतमाळ व वाशिम या चार जिल्ह्रांतील 18 ते 25 वर्ष वयोगटातील विद्याथ्र्यांकडून दि. 16 मार्च पर्यंत ‘माय भारत पोर्टल’वर स्वत:च्या वकृत्व शेैलीत विकसित भारत म्हणजे तुमच्यासाठी काय? या विषयाचा एक मिनिटाचा व्हिडीओ मागविण्यात आला होता. त्यामधून दि. 17 मार्च, 2025 रोजी स्क्रिनिंग कमिटीद्वारे 150 विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या विद्याथ्र्यांचे 20 व 21 मार्च रोजी ‘वन नेशन, वन इलेक्शन : पेÏव्हग दी वे फॉर विकसित भारत’ या विषयावर 3 मिनिटांमध्ये मते नोंदविण्यात आलीत. परिक्षक म्हणून अमरावतीचे माजी पोलीस अधीक्षक श्री पी.टी. पाटील, अधिसभा सदस्य डॉ. प्रशांत विघे, श्री अमित देशमुख, श्री नितीन टाले, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. देवलाल आठवले यांनी भूमिका पार पाडली. निरिक्षकांनी केलेल्या परिक्षणानुसार दहा विद्यार्थी राज्यस्तरीय युथ पार्लमेंटकरिता निवडण्यात आले असून सदर दहा विद्याथ्र्यांना राज्यस्तरावर होणा-या युथ पार्लमेंटमध्ये आपली मते मांडावी लागणार आहेत व त्यामधून तीन विद्यार्थी हे राष्ट्रस्तरीय युथ पार्लमेंटकरिता निवडण्यात येवून भारतीय संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये या तीन विद्याथ्र्यांना संसद सदस्यांप्रमाणे बोलण्याची संधी प्राप्त होणार आहे. निवड झालेल्या विद्याथ्र्यांना पुढील यशासाठी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू यांनी शुभेच्छा दिल्यात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!