LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

प्रहार जनशक्ती पक्षाचं 11 एप्रिलला मशाल आंदोलन – बच्चू कडूंची मोठी घोषणा

अमरावती: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाची घोषणा केली आहे. 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने आणि 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मशाल आंदोलन छेडण्यात येणार आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडूंनी अमरावती जिल्ह्यातील पुरळ पूर्ण येथे पार पडलेल्या राज्य संवाद मेळाव्यातून ही घोषणा केली.

आंदोलनाचा उद्देश आणि स्वरूप

या आंदोलनाच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवणार आहे. 11 एप्रिलला राज्यभरातील आमदारांच्या घरावर मशाल फेको आंदोलन करण्यात येणार असून शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला जाईल.

बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा व्यापक उत्सव

14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. सामाजिक समरसता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन विशेष महत्वाचं ठरणार आहे.

राज्यस्तरीय संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित या संवाद मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, माजी नगरसेवक दिनेश भाऊ, तसेच पक्षाचे इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.


Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!