LIVE STREAM

AmravatiLatest NewsMaharashtra

म्हाडाच्या जनता दरबारातील तक्रारी आठ दिवसात निघणार निकली

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत अमरावती म्हाडा कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या दरबारात उपस्थित नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या येत्या आठ दिवसांत सोडविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

22 एप्रिल रोजी अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळात दुपारी 12 वाजता आयोजित जनता दरबारात मंडळाचे मुख्य अधिकारी विशाल देशमुख यांनी थेट नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

दरबारात प्राप्त तक्रारी व पुढील कार्यवाही:
एकूण 7 नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून, गृहनिर्माणाशी संबंधित विविध अडचणी, दस्तऐवजीकरण, फ्लॅट वाटप व देखभाल यासारख्या मुद्यांवर चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसांच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जनता दरबारात उपस्थित अधिकारी:
उपमुख्य अधिकारी जयकुमार नामेवार, कार्यकारी अभियंता दिलीप कळसकर, मुख्य लेखाधिकारी अतुल देवके, तसेच मिळकत व्यवस्थापक स्वप्नील भारती यांची उपस्थिती होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!