LIVE STREAM

AmravatiLatest News

पहिल्या पावसानेच केले मनपाच्या स्वच्छ अभियानाचे पितळ उघड

नवसारी परिसरात सैनिकी वस्तीगृह रस्त्यावर डम्पिंग यार्डसारखी परिस्थिती, नागरिक त्रस्त

अमरावती – शहरात मान्सूनची चाहूल लागताच महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे पितळ उघड झाले आहे. नवसारी परिसरातील सैनिकी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा फेकण्यात आला असून, संपूर्ण परिसर डम्पिंग यार्डसारखा दिसू लागला आहे.

घराघरात कचरा; आरोग्य धोक्यात
रस्त्याच्या दुतर्फा महानगरपालिकेच्या गाड्यांमधून कचरा खाली टाकण्यात येतो, परिणामी हा कचरा थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. दुर्गंधी, माश्या व संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून नागरिकांना मानसिक व आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागत आहे.

तक्रारी असूनही परिस्थिती ‘जैसे थे’
परिसरातील नागरिकांनी अनेकदा महानगरपालिका प्रशासनाला लेखी व मौखिक तक्रारी केल्या असूनही, परिस्थितीत कसलाही बदल झालेला नाही. कचरा साफसफाईसाठी केवळ फोटोसेशनपुरती कारवाई होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

नागरिकांचा सवाल — ‘मनपा झोपेत का?’
“स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च होतात, पण प्रत्यक्षात मात्र आम्ही डंपिंग यार्डमध्ये राहतोय,” असा सवाल करत महानगरपालिकेच्या झोपेवरुन नागरिक संतप्त झाले आहेत.

मागणी: त्वरित कारवाई करा
नवसारी परिसरातील नागरिकांनी कचरा त्वरित हटवण्यात यावा, संपूर्ण रस्ता निर्जंतुक करण्यात यावा आणि भविष्यात कचरा टाकू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!