LIVE STREAM

AmravatiBusinessLatest News

मलाबारचा भूकमुक्त भारत उपक्रमाला हिरवी झेंडी

अमरावती – भारत देश भूकमुक्त व्हावा या प्रेरणादायी उद्देशाने मलाबार ग्रुपच्या वतीने देशभरात १६० ठिकाणी राबवण्यात येत असलेल्या विशेष संकल्पनेचा शुभारंभ अमरावतीत करण्यात आला. जागतिक भूक दिवसाच्या औचित्याने आयोजित या उपक्रमाची सुरुवात आज उत्साहात आणि सामाजिक जाणिवेने करण्यात आली.

अमरावतीतील या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, समाजसेवक गोपालदास चांडक, माऊली हुमन्स फाउंडेशनच्या स्वाती बडगुजर, तसेच नलिनी थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

उपक्रमाचा उद्देश:
या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट भारतातील उपासमारी आणि भुकेमुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे व जनजागृती करणे हे आहे. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अन्नवाटप, जनजागृती मोहीम, तसेच गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

अमरावतीसह देशभरातील या उपक्रमात स्थानीय स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये व सामान्य नागरिक यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात येत आहे. या उपक्रमातून ‘भूकमुक्त भारत’ या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!