LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

दर्यापूरमध्ये रंगला आगळावेगळा विवाह सोहळा!

दर्यापूर : दर्यापूर तालुक्यात आज एक समाजाला प्रेरणा देणारा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. माहुरे व वर्गे कुटुंबात झालेल्या या समारंभात चिरंजीव विकी आणि सौ. ऋतुजा यांच्या विवाहाच्या निमित्ताने रक्तदान, समाजसेवा आणि पारंपरिक वारकरी परंपरेचा समावेश करण्यात आला होता.

आदर्श विवाहाची वैशिष्ट्ये:
नवरदेव विकीची वरात ही पारंपरिक बैलगाडीवरून जय हरी विठ्ठलच्या जयघोषात निघाली.
विवाहस्थळी पोहोचल्यानंतर नवविवाहित दाम्पत्याने सर्वप्रथम रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला.
या प्रेरणादायी उपक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्तेही सामील झाले आणि रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.

शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात:
मोहरे कुटुंबाकडून आत्महत्याग्रस्त ११ शेतकरी कुटुंबांना पेरणीसाठी बी-बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
यासोबतच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती:
या समाजहिताच्या विवाह सोहळ्याला महाराष्ट्राचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्वतः उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिला.
“हा विवाह म्हणजे समाजासाठी एक आदर्श आहे. प्रत्येक विवाहात असे समाजहिताचे उपक्रम राबवले गेले पाहिजेत,” असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!