पराग गवई यांच्याकडून चार बेवारस मृतदेहांचे स्वखर्चातून अंत्यसंस्कार

अकोला : अकोला जिल्ह्यातील रुग्णसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. शहरातील चार बेवारस मृतदेहांचे त्यांनी स्वखर्चातून अंत्यसंस्कार करून समाजासमोर माणुसकीचा अनोखा आदर्श मांडला आहे.
चार मृतदेह, कोणतीही नातेसंबंधाची नोंद नाही
अकोल्याच्या मुर्तिजापूर ग्रामीण, रामदास पेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार दिवसांपासून चार बेवारस मृतदेह सापडले होते. या मृतदेहांबाबत नातेवाईक किंवा ओळख पटली नसल्याने पोलीस प्रशासन अडचणीत सापडले होते.
पराग गवईंच्या पुढाकाराने झाला सन्मानपूर्वक अंत्यविधी
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने रुग्णसेवक पराग गवई यांच्याशी संपर्क साधला. तत्काळ पुढाकार घेत पराग गवई यांनी शहरातील मोहता मिल येथे विधिवत पूजन करून या चार अनोळखी मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे हे संपूर्ण कार्य त्यांनी कोणतीही मदत न घेता स्वतःच्या खर्चातून पार पाडले.
रुग्णसेवेचा 20 वर्षांचा प्रवास
गेल्या दोन दशकांपासून पराग गवई अकोला शहरात रुग्णसेवा, बेवारस मृतदेहांची काळजी, आणि सामाजिक मदतीच्या कामात सातत्याने कार्यरत आहेत. अनाथ, बेवारस आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देणं हेच त्यांनी आपले जीवनध्येय मानले आहे.
पराग गवई (रुग्णसेवक) यांचे म्हणणे :
“या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणं ही केवळ सेवा नव्हे, तर माझं सामाजिक कर्तव्य आहे. माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी हीच खरी रचना आहे.”
या कृत्यामुळे पराग गवई यांचे शहरात कौतुक होत असून, अशा सेवाभावी वृत्तीमुळेच अकोला