LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

चांदुर बाजार ते गुरुकुंज मोझरी येथे मोठ्या संख्येने शेतकरी रॅली व उपोषणामध्ये सहभागी

चांदुर बाजार : विद्यमान शासनकर्त्यांनी निवडणूकी दरम्यान जनतेला आश्वासनाची खैरात केली. त्यात शेतकर्‍यांची कर्जमाफी या महत्वाच्या आश्वासनाचा समावेश आहे.लाडकी बहिणींना १५०० रु.महिना देण्याच्या योजनेने शासनाला चांगलेच जेरीस आणले असल्याचे सरकारच्या निधी वळविण्याच्या चर्चेतून दिसून येते.शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी किसान ब्रिगेडसह माजी आ.दिव्यांग समीतीचे अध्यक्ष बच्चु कडु यांनी पुढाकार घेतला आहे.बच्चु कडु यांनी शेतकर्‍यांच्या कर्ज मुक्तीसाठी गुरुकुंज मोझरी येथे आज ८ जुन पासून आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.चांदुर बाजार येथून मोठ्या संख्येने रॅली ला सुरुवात करण्यात आली आहे या रॅली मध्ये तत्पुर्वी त्यांचे प्रसिध्द केलेले “कडु सवाल”हे व्यंगचित्र चांगलेच चर्चेत आले आहे.

शेतकरी, शेतमजूर व दिव्यांग, निराधार यांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे शासन लक्ष देत नाही, या विरोधात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळाचे दर्शन घेऊन गुरुकुंजात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. ८ जूनपासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
आज राज्यातील लाखों शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाला हमीभाव मिळत नसल्याने त्यांचे उत्पन्न शून्याच्या आसपास पोहोचले आहे. दिव्यांग अपंग, निराधारांना आजही केवळ १५०० रुपये तुटपुंज्या मानधनावर जगावं लागतं. शेतकऱ्यांना कर्जमाफी व दिव्यांग बांधवांना किमान ६००० रुपये मानधन मिळवून देण्यासाठी माजी आ.बच्चु कडु यांनी बेमुदत अन्नत्यागाचा मार्ग अवलंबिलेला आहे.

व्यंगचित्राच्या माम्यमातून माजी आ.कडु यांनी सरकारच्या वादाखिलाफी व निष्क्रीयतेवर “कडु सवाल” विचारुन तिव्र हल्ला केला आहे.या व्यंगचित्राच्या माध्यमातुन त्यांनी मुख्यमंत्र्याच्या नियतीवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.ज्यात शासनाद्वारे केल्या गेलेल्या आश्वासनांची पोलखोल केली आहे.या व्यंगचित्रात मुख्यमंत्रीद्वारा घोषीत योजना व घोषणाचा बोजाचा गाडा गरीब जनता चालवित आहे.मात्र शासनाकडुन त्यांना कवडीचीही मदत मिळत नाही.
तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या घोषणा केवळ निवडणुकीपर्यंतच सीमीत होत्या.१२ हजार रोजगार ची घोषणा केवळ दिखावा सिध्द झाली.बेरोजगार व दिव्यांना ठोस असा लाभ मिळाला नाही.या मुद्यावर अनेकदा प्रश्न विचारल्यावर सुध्दा आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.व्यावहारीक अंमल मात्र झाला नाही.यावर ठोस निर्णय घेउन शेतकरी कर्जमाफीची तात्काळ अमलबजावणी साठीच बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागल्याचे माजी आ,बच्चु कडु यांनी सांगीतले.त्यांनी पहिल्यांदाच व्यंगचित्राच्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.आज पासून या रॅली माध्यमातून मोठ्या संख्येने शेतकरी व विविध संघटनाचे पाठिंबे या आंदोलनाला देण्यात आले आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!