राजापेठ भाजप कार्यालय येथे भाजप अमरावती जिल्हा कार्यशाळा उत्साहात संपन्न
अमरावती : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ११ यशस्वी वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालखंडात देशभरात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या योजनांच्या माध्यमातून ‘संकल्प से सिद्धि तक’ हा प्रवास साध्य करण्यात आला आहे. त्यानिमित्य दिनांक ०७ जून रोजी भाजप कार्यालय राजापेठ येथे भाजप अमरावती जिल्हा ग्रामीणची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये केंद्र सरकारच्या ११ वर्षांतील कामगिरीचा आढावा घेऊन, त्या योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख हे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश सचिव जयंत डेहनकर उपस्थित होते. तसेच संकल्प से सिद्धी कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक प्रवीण राऊत, योग दिन संयोजक राजेंद्रजी मस्के, शामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन संयोजक अमित कुबडे, आपातकाल संयोजक तात्यासाहेब मेश्राम, पर्यावरण संयोजक योगेश्वर जी खासबागे, सह मंचकावर अनिताताई तिखिले अध्यक्ष महिला आघाडी, विवेकजी गुल्हाने, अजिंक्यजी वानखडे, सुभाष श्रीखंडे, रामदादा जोशीं, सुखदेवजी पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिनकर सुंदरकर यांनी तर प्रास्ताविक प्रा सुमित पवार आभार धनंजय उमप यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्ष तथा संयोजक समितीचे सदस्य उपस्थित होते
संकल्प से सिद्धि तक; मोदी सरकारची यशस्वी ११ वर्षे विकसित भारताची: जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाली असून विकसित भारताची ऐतिहासिक घोडदौड या कालखंडात झाली आहे. देशाच्या विकासाचे अभूतपूर्व व्हिजन ठेवून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या ११ वर्षात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर संकल्प से सिद्धि तक या कार्यशाळेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेऊन, त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धन या कार्यशाळेत करण्यात आला आहे. असे प्रतिपादन यावेळी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले.