LIVE STREAM

AmravatiLatest News

समृद्धी महामार्गवर वाहनाचा अपघात, एका युवकाचा मृत्यू, तिघे जखमी

अमरावती: समृद्धी महामार्गवर वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात नवा नागपूर येथील विवेक संतोष आजबे ( वय 17 वर्ष रा. गजानन काॅलनी नवा नागपूर) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विवाह समारंभासाठी विवेक आजबे हा आपल्या कुटूंबासह नागपूरला जात होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास वाहन चालकाचे स्काॅर्पियो जीपवरिल नियंत्रण सुटल्याने जीप दुभाजकावर आदळली. ही घटना अमरावती व अकोला हद्दीतील समृद्धी महामार्गवर घडली. यात वाहनातील आठ पैकी तीन प्रवासी गंभीर जखमी झाले बाकींना किरकोळ दुखापती झाल्या. त्यात विवेक आजबे याला गंभीर दुखापत झाली. मागुन दुसऱ्या वाहनातुन येत असलेल्या विवेकच्या वडिलांनी त्याला गंभीर अवस्थेत अकोला जवळ असलेल्या ऑयकाॅन रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आजबे यांच्या नातेवाईकांनी अक्षर मानवचे महाराष्ट्र राज्य कार्यवाह आझाद खान हे विदर्भात राहत असल्यामुळे त्यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. आझाद खान यांनी लगेच अक्षर मानव संघटनेचे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रा अनिलकुमार दडमल यांना सदर घटनेची माहिती देवुन मदत करायला सांगितले. प्राध्यापक अनिल दडमल लगेच हाॅस्पिटमध्ये मदतीला पोहोचले डॉक्टरांशी संपर्क साधुन जखमींवर लवकरात लवकर उपचार व्हावेत आणि नविन ठिकाणी असलेल्या नातेवाईकांसोबत कुटूंबीय म्हणून उपस्थित राहिले. काही लागलं तर दिवसभर धावपळ करत होते. अक्षर मानव तर्फे ते दिवसभर उपस्थित होते.

  • अक्षर मानव संघटना धावली मदतीला…
  • अक्षर मानव धावपळ पथक अंतर्गत मदत

सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र भर समाजाच्या भल्यासाठी, माणसांच्या मदतीला उभं राहण्याचा व समाज शांत,सुखी करण्यासाठी अक्षर मानव काम करणारी माणसांची संघटना आहे.‌ अक्षर मानव मानवी जगण्याच्या 70 अधिक विषयात काम महाराष्ट्र भर करते. या मध्येच एक धावपळ विभाग आहे. या मध्ये कुणी आजारी आहे का?, कुणाला रक्त हवंय का? कोणाला एकटं पडल्यासारखे वाटतंय का? कुणाला औषधं हवी का? कुणाला अपघात झाल्यास मदत हवीय का..? संकट काळी आम्ही मदतीला जातोय यासाठी अक्षर मानव धावपळ विभागात महाराष्ट्र भर राज्य धावपळ विभाग, जिल्हा धावपळ विभाग, तालुका धावपळ विभाग आमची रचना असुन संपूर्ण महाराष्ट्र भर व्हाट्सअप गृप आहेत. जागोजागी मदतीला आमची माणसं उभी राहतात असं काही माहिती पडलं की आम्ही एक कुटुंबीय म्हणून मदतीला धावून जातो. नवीन ठिकाणी त्यांना खूप मोठा आधार मिळतो. अक्षर मानव धावपळ पथक मध्ये सहभागी होण्यासाठी किंवा मदतीसाठी 9975326210 या मो्. क्रमांकवर संपर्क करु शकता अशी माहिती अक्षर मानवचे महाराष्ट्र राज्य कार्यवाह आझाद जमा खान यांनी आम्हाला माहिती दिली.

अडीच तास अम्ब्युलन्स आलीच नाही.

या अपघाता दरम्यान वाहनांच्या मागे विवेक आजबे यांच्या वडीलांचे वाहन येत होते. घटनास्थळी कोणीही मदतीला आल नाही. त्यामुळे विवेकच्या वडिलांनी 108 या क्रमांकावर फोन करून एंम्ब्युलन्स बोलावण्याचा प्रयत्न केला परंतु अनेकदा संपर्क होवुनही एंम्ब्युलन्स सुमारे अडीच तास आली नाही या दरम्यान नाईलाजाने वडिलांनी त्याला आसपासच्या रुग्णालयात नेले परंतु ऑक्सिजनची सोय होवू शकली नाही. त्यामुळे वेळेत अत्यावश्यक उपचार होवु शकले नाहीत. शेवटी अकोला 55 किलोमीटरवर असल्याने आपल्याच वाहनातुन त्यांनी अकोला गाठले समृद्धी महामार्गवर अडीच तास एंम्ब्युलन्स न मिळाल्याने आपल्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाला असून हा व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याची खंत मृत विवेकचे वडिल संतोष आजाबे यांनी अक्षर मानवचे राज्य कार्यवाह आझाद जमा खान यांच्या जवळ व्यक्त केली.
या विरोधात आपण सरकार दरबारी संबंधितांवर कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार जेणे करून भविष्यात कुणाच्या घरात असा उपचाराअभावी जीव जावू नये. एकुलता एक मुलगा गेल्याने एका बापाची तळमळ दिसत होती. आजबे कुटूंबातील इतक्या तरुण वयात मुलगा गेल्याने नवानागपूर परिसरात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!