धामणगावमध्ये प्रहार कार्यकर्त्यांचा संताप; शास्त्री चौकात टायर जाळून चक्काजाम

धामणगाव रेल्वे : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव शहरात आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करत सरकारविरोधी आक्रोश केला. शहरातील मुख्य शास्त्री चौकात टायर जाळून चक्काजाम करत कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या मोझरी येथील सुरु असलेल्या अन्नत्याग उपोषणाला पाठींबा दर्शवत धामणगावातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. “सातबारा कोरा करा”, “दिव्यांगांना ६ हजार मानधन द्या”, “शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा विविध मागण्यांसह संतप्त घोषणांनी परिसर दणाणून गेला.
- आंदोलनाच्या मुख्य मागण्या:
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा - दिव्यांगांना दरमहा ₹6000 मानधन देण्यात यावे
- शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे
- मनरेगाच्या मजुरीत वाढ व्हावी
सरकारला इशारा:
बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सरकारने त्वरीत दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी दिला आहे.
- प्रत्यक्षदृश्ये:
शास्त्री चौकात प्रहार कार्यकर्त्यांचा मोर्चा - टायर जाळून रस्ता रोको
- संतप्त घोषणाबाजी आणि नागरिकांची गर्दी
प्रहारचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले:
“शेतकरी, दिव्यांग, शेतमजूर यांच्यासाठी लढणाऱ्या बच्चू भाऊंच्या आंदोलनाची आम्ही पूर्ण पाठराखण करतो. सरकारला जाग यायला हवी, अन्यथा हा आक्रोश आणखी भडकणार!”