शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्ती मिळणार, प्रवीण तायडे यांचे आश्वासन.

अचलपूर : अचलपूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात राजकीय श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असतानाच अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कर्जमाफीचा निर्णय केंद्र व राज्य सरकारचा असून कोणत्याही नेत्याने याचे श्रेय घेऊ नये.
“देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व आहे. येत्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित होणार असून, त्यासाठी राज्य सरकारने आर्थिक बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. लवकरच समिती स्थापन होऊन कर्जमुक्तीची प्रक्रिया सुरु होईल,” असे आमदार तायडे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत, “कोणत्याही योजनेचं श्रेय घेऊ नये,” असा स्पष्ट इशारा दिला.
याशिवाय, गारपिटीमुळे झालेल्या केळी व संत्रा पिकांच्या नुकसानीबाबतही आमदार तायडे यांनी भाष्य करत सांगितले की, सरकारी यंत्रणा नुकसानग्रस्त क्षेत्राचा सर्वेक्षण करत असून शेतकऱ्यांना लवकरच मदत जाहीर करण्यात येईल.
अचलपूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योजना लवकरच राबविण्यात येणार आहेत,
प्रतिनिधी – नितेश किल्लेदार