अचलपूर-परतवाडा परिसरातील केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना धान्य द्यावे; भाजप शिष्टमंडळाकडून निवेदन
अचलपूर : अचलपूर तालुक्यातील आणि परतवाडा शहरातील पात्र असूनही धान्यापासून वंचित असलेल्या केशरी राशनकार्डधारक शेतकऱ्यांना तातडीने धान्यपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी आज भाजप कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
पात्र असूनही लाभापासून वंचित
अनेक महिन्यांपासून केशरी रंगाच्या शिधापत्रिका (राशनकार्ड) असलेल्या लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे नागरिक राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असूनही, त्यांना धान्य मिळत नसल्याने अचलपूर व परतवाडा परिसरात असंतोषाचे वातावरण आहे.
भाजप माजी नगरसेवकांसह शिष्टमंडळ
या मागणीसाठी भाजपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब वानखडे, अक्षरा लहाने, सौरभ रहाटे, दिलीप राऊत, राजा महाजन, पंकज झोड, अनिकेत कळमकर, गणेश जावरकर, बंडू साखरे, गणेश मढगे, पंडित महाराज, अजाबराव शहारे, अंकुश भारसाकळे आदींनी प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
महिलांचा मोठा सहभाग
या निवेदन प्रसंगी ड्युटे काकू, रवाले ताई, वाट काकू, शर्मा काकू, गुप्ता काकू, घोटेकर ताई, भोसले ताई, उईके ताई, पळसपगार ताई, वानखडे ताई यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेतकऱ्यांमध्येही नाराजी असून, अन्नधान्यापासून होणाऱ्या वंचनामुळे घरगुती अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या गावांतील नागरिकांनी घेतला सहभाग
आठवडी बाजार, रेल्वे स्टेशन, टपालपुरा, कविठा, घोडगांव, देवमाळी, जवर्दी, बळेगाव, बोर्डी, भुगांव, खोजनपूर, चमक आदी गावांतील शेतकरी बंधू व महिला या निवेदन प्रक्रियेत सहभागी झाले होते.