मातोश्री वृद्धाश्रमात राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
अमरावती : अमरावती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठीह्रदयसम्राट राज ठाकरे यांचा वाढदिवस आज अमरावती जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मातोश्री वृद्धाश्रमात आज जिल्ह्यातील मनसैनिकांनी एकत्र येऊन वृ्द्धांना अन्नदान करत वृद्धाश्रमाच्या परिसरात वृक्षारोपण करून राज ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नेहमीच समाजकारणाला प्रथम प्राधान्य देण्याची शिकवण दिली असून त्याचा विचारांवर आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केल्याची भावना मनसेचे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
आज राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी मातोश्री वृद्धाश्रमात एकत्र आले. यावेळी त्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाच्या परिसरात विविध वृक्षांची रोपे लावून तसेच त्यांचें संगोपन करण्याचा संकल्प करित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची रेलचेल सुरू ठेऊन समाजात पक्ष वाढविण्याचा देखील निर्धार केला.यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राष्ट्रपती उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सुखदेवराव राऊत यांनी देखील राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन आजच्या राजकारणात राज ठाकरे यांच्यासारख्या कणखर नेतृत्वाची गरज समाजाला असल्याची भावना व्यक्त करित त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आशिर्वाद दिलेत. यावेळी राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मित्र तसेच सुप्रसिद्ध चित्रकार तथा प्राचार्य विजय राऊत तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष राज पाटील, जनहित संघटनेचे संघटक प्रवीण डांगे, मनसे उपजिल्हाध्यक्ष गजानन काजे, नितीन लुंगे, तालुकाध्यक्ष मनोज तायडे, कामगार सेना प्रमुख विक्की थेटे, अक्षय काजे, निलेश मुधोळकर, दिलीप नवलकर, प्रशांत देशमुख, प्रथमेश राऊत, मेहेर ठाकरे, दिनेश जगताप, राजेश कश्यप, तेजस जमकजोड, अक्षय गुलक्षे, दिलीप गुलेरकर, वैभव ठाकरे, मंथन तेलंगे, विजय उईके, हेमराज परते, देवेंद्र फोंडे, चंदू मोहोळ, संजय शेंडे, रामकिसन परते, जीवन परते, शंकर परते, राजेश दहीकर, विशाल चव्हाण, रावसाहेब काजळकर, उमेश जावरकर, राहुल श्रीराम, सुनील पुंड, पवन राऊत, पवन लेंडे, जनार्दन गावंडे, सतीश शिरभाते, विजय साखरे, सचिन बावनेर, विशाल वर्हेकर, प्रणव देशमुख, विशाल शिरभाते आदी मनसे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महाराष्ट्राच्या भल्याचा विचार राज ठाकरेंनीच करावा – विजय राऊत
राज ठाकरे यांच्यासारखा समाजाचा विचार करणारा आणि प्रखरपणे बोलणारा नेता या महाराष्ट्रात नाही. राज ठाकरे यांच्या वक्तृत्वामुळेच अनेकांना फायदा झाला. परंतू राज ठाकरे यांनी स्वत:चा फायदा कधीही बघितला नाही. आपल्याकडे आमदार असो किंवा नसो, यश मिळो अथवा न मिळो आपला विचार आणि महाराष्ट्राच्या भल्याशी कधीही फारकत घ्यायची नाही हा त्यांचा ठाम निर्धार आहे आणि असे करण्याची धमक केवळ त्यांच्यातच आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूस आणि हाडा मासाचा मनसैनिक आजही संघटनेत जीवंत आहे. आज पक्ष संघटनेला अशाच पक्क्या कार्यकर्त्यांची गरज असून सर्वांनी जोमाने काम करून संघटना वाढवावी असा सल्ला विजय राऊत यांनी यावेळी बोलताना दिला.
जनतेच्या मागण्यांसाठी मनसैनिक लढत राहतील – राज पाटील
जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात मराठी माणसावर संकट आले, हिंदूच्या हक्कांसाठी लढण्याचा विषय आला त्यावेळी राज ठाकरे यांची तोफ कडाडली आहे. आजही गावागावातील मनसैनिक सामान्य जनतेच्या कोणत्याही अडचणीत धावून जातो हे मनसैनिकांचे वैशिष्ट्य आहे. आमच्याकडे कोणतेही सरकारी पद नाही, संपत्ती नाही तरीही आम्ही लढत राहतो आणि काम करत राहतो. कारण आमचा विश्वास हा राज ठाकरे यांच्या विचारांच्या पाठिशी आहे. आज अमरावती जिल्हयात मनसेची चळवळ अधिक मजबूत करण्याचा संकल्प मी या ठिकाणी सर्वांच्या समक्ष करत असतानाच आपण सर्वांनी जनतेसाठी लढत राहू असा विश्वास समाजाला देऊन काम करत राहू असा विश्वास मनसे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांनी यावेळी मनसैनिकांशी बेालताना दिला.