विद्यार्थ्यांचे यश हि खरी संपत्ती तर सैनिकांचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान: रविराज देशमुख

अमरावती : विद्यार्थ्यांचे यश हि खरी संपत्ती असून विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुक करणं हे पालकांचं आद्य कर्तव्य आहे. एखाद्या विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप देणे म्हणजे त्याला आणखी प्रेरणा देणे होय त्याचबरोबर सैनिकांचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान असून देशसेवेसाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी पुसला व जिल्हा परिषद सर्कल वरुड द्वारा आयोजित गुणवत्त विद्यार्थ्यांचा व माजी सैनिकांचा सत्कार समारंभाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले.
भारतीय जनता पार्टी पुसला व जिल्हा परिषद सर्कल वरुड द्वारा पुसला येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आले होते. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन यावेळी करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्रजी केदार, मोर्शी वरून विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री चंदूभाऊ यावलकर, निवडणूक प्रमुख डॉ. मनोहरराव आंडे, अतिरिक्त निवडणूक प्रमुख अमितजी कुबडे, मंडळ अध्यक्ष राजकुमार राऊत, तात्यासाहेब मेश्राम, प्रवीण राऊत, बाळासाहेब सोलव, पिंटूभाऊ सावरकर, अंजलीताई तुमडाम, अर्चनाताई मुरूमकर (माजी जि. प. सभापती), प्रभाकरराव काळे, रामभाऊ जोशी, धनंजय उमप, चैतालीताई ठाकरे (माजी प. स. सदस्य), राजश्रीताई श्रीराव (जि. प. सदस्य), सुषमाताई सरोदे (मंडळ अध्यक्ष), माधुरीताई भगत, प्रतिभाताई महल्ले, विजयभाऊ श्रीराव, योगेश्वरजी खासबागे, युवराजजी आंडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते, विद्यार्थी युवक व गावकरी उपस्थित होते.