शिवशाही संपली… आता महाराष्ट्रात अनैतिकतेचं राज्य – यशोमती ठाकूर

पुण्यातील शिवशाही बस प्रकरणानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर माजी मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या घटनेला नैतिकतेचा अंत असल्याचे सांगत, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात शिवशाही संपली आणि आता पेशवाईचं राज्य आलं आहे, असे परखड मत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी या घटनेवर रोष व्यक्त करत नैतिकता संपल्याची टीका केली असून, सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यावर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जेव्हा एसटी डेपोमध्ये अशा घटना घडत असतील आणि जबाबदार लोक त्याकडे दुर्लक्ष करत असतील, तेव्हा महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आंदोलन करणारे अनेक कार्यकर्ते आता शांत का आहेत, कारण त्यांना पदं मिळाली आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे.
शिवशाही बस प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर जोरदार टीका करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आता राज्य सरकार काय निर्णय घेते आणि या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.