काटेपूर्णा प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी पाणी नाही; शेतकऱ्यांमध्ये चिंता

अकोला :- शेतकऱ्यांसाठी उन्हाळी हंगाम महत्त्वाचा असतो, मात्र काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी न सोडण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या पत्रानुसार, उन्हाळी पिकांसाठी पाणीपुरवठा करणे शक्य नाही, यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
अकोला तालुक्यातील कौलखेड, दहिगाव, रामगाव, मजलापूर, दापुरा, गोंदापूर नाक्खेड, बहिरखेड आणि शहापूर येथील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामासाठी पाणी मिळणार नाही. तीळ, मका, ज्वारी आणि गव्हाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या पिकांसाठी मोठे संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी पेरणी केली, मात्र आता पाण्याअभावी ही पिकेही धोक्यात आली आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पाण्याच्या अभावामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या परिस्थितीवर सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मागणीवर सरकार गांभीर्याने पाऊले उचलणार का? की पुन्हा एकदा शेतकरी संकटात टाकला जाणार? हे पाहणे गरजेचे आहे. सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पुढील घडामोडींसाठी पाहत राहा City News.