सर्वज्ञ फाउंडेशन रोटी बँकचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अमरावती : सरस्वती नगरातील माजी नगरसेवक स्व. रमेशजी पावडे यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या सर्वज्ञ फाउंडेशन रोटी बँक या सेवाभावी संस्थेचा आठवा वर्धापन दिन अभिनंदन पेंढारी मित्र मंडळींनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
सर्वज्ञ फाउंडेशन वर्षभर गोरगरीब, बेघर, वृद्ध, दिव्यांग, निराधार व भुकेल्यांना अन्नदान, कपडे वाटप, चपल, पांघरूण, औषधी वाटप यांसारखे उपक्रम राबवत असते. या संस्थेच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र पातळीवरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची थोडक्यात झलक
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजसेवक पुरुषोत्तमजी मुंदडा यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनंदन पेंढारी, दीपक हुंडीकर, पुष्पलता पावडे, महेंद्र देशमुख, आबासाहेब कडू, हरिहर बोचरे, सुषमा ताजने, शीतल सिघवी आणि अरविंद लुंकड यांची उपस्थिती होती.
स्व. रमेश पावडे यांचे प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अभिनंदन पेंढारी यांनी प्रास्ताविकात फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत कोरोना काळातील सेवाकार्याची विशेष नोंद केली.
मनिष आणि वैशाली पावडे यांचा विशेष सन्मान
राळेगण सिद्धी येथे पद्मश्री अण्णा हजारे यांच्या हस्ते सेवाकार्यासाठी झालेल्या सन्मानाच्या पार्श्वभूमीवर, या कार्यक्रमात मनिष आणि वैशाली पावडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मोत्याची माळ, सन्मानपत्र व वृक्ष देऊन गौरव करण्यात आला. अभिनंदन पेंढारी मित्र परिवार, महेंद्र विद्यालय, व वृक्षसंवर्धन समिती यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांचे विचार
कार्यक्रमात पुरुषोत्तम मुंदडा, दीपक हुंडीकर, महेंद्र देशमुख, वऱ्हाडी कवी आबासाहेब कडू, सुषमा ताजने, हरिहर बोचरे, बिजय बर्वे, अरुण बनारसे, राणी खोकसे यांसह अनेक मान्यवरांनी सर्वज्ञ फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की,
“गोरगरीब, अनाथांची सेवा म्हणजेच खरे पुण्यकर्म आहे. ही सेवा म्हणजे ईश्वरी कार्य असून, हे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.”
कार्यक्रमाचे संयोजन आणि आभार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष पावडे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या आठ वर्षांच्या सामाजिक प्रवासाचे वर्णन करत भावनिक संवाद साधला. आभार प्रदर्शन वैशाली पावडे यांनी करताना, सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले आणि भविष्यातील सेवाभावी कार्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
उपस्थित मान्यवरांची नावे:
सुरेश रतावा, मयूर अग्रवाल, सतीश माकोडे, सचिन चव्हाण, शीतल सिघवी, नितीन टाले, रगराव, सुनीता गोरे, प्रणाली खोकणे, वर्षा खडारे, दादाराव डिवरे, प्रदीप गोरे, अनिरुद्ध काळे, मनिष गिरी, साक्षात, सर्वज्ञ पावडे आणि अनाथ बांधव यांची विशेष उपस्थिती नोंदविण्यात आली.