नागरिकांनी मनपाचे कंटेनर का रोखले, रस्ता केला चक्काजाम

अमरावती :- अमरावती भातकुली मार्गावर रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरु असल्याने वाहनांना दुसरा पर्यायी मार्ग देण्यात आला, मात्र याच पर्यायी मार्गावर अनेक कंटेनर जात असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले अखेर प्रशासनाला जागे करण्यासाठी रहिवाश्यानी चक्क रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले, या दरम्यान वाहतूक अनेक तासापर्यत ठप्प झाली होती .
अमरावती भातकुली महामार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरु असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून पठाण चौक ते भातकुलीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे, त्यामुळे महानगरपालिकेच्या कचऱ्याचे कंटेनर नेण्याचा रस्ता सुद्धा बंद झालेला आहे, अशात महानगरपालिकेकडून वाहनांना येजा करण्यासाठी पर्यायी रस्ता दिला, याच पर्यायी मार्गावर अनेक वाहने सह अनेक कचरा कंटेनर ची वाहतूक होत आहे, अशात मात्र दिवसभर या रस्त्याने महानगरपालिकेच्या कंटेनर ची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याच महानगरपालिकेच्या कंटेनरच्या वाहनांनी रस्त्याची दुरावस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकदा अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर येथी रहिवासी रस्त्यावर उतरले , शुक्रवार 13 डिसेंबर रोजी स्थानिक नागरिकांनी चक्क रस्ता रोको आंदोलन केले, यावेळी अनेक महानगरपालिकेच्या कचऱ्याचे कंटेनर सुद्धा रोखण्यात आले, जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळणार नाही तोपर्यंत गाड्या जाऊ देणार नाही असा पवित्रा सुद्धा स्थानिक नागरिकांनी घेतला आहे.