LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

धारणी मध्यप्रदेश सीमारेषेवर असलेला खांब ठरत आहे जीवघेणा, अनेकांचा गेला बळी

     धारणी ते मध्यप्रदेश जाणाऱ्या मार्गावरील बुरळघाट जवळ  घाटजवळ रस्त्याच्या मधात असलेला विद्युत खांब हा आता पुन्हा जीवघेणा ठरत आहे, याच खांबामुळे ५ जणांचा बळी गेला, अद्यापही यावर प्रशासना ने लक्ष दिले नाही त्यामुळे आगामी दिवसात पुन्हा भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, प्रशासनाने यावर लक्ष देऊन विद्युत खांब काढण्यात यावे अशा मागणीला आता जोर धरत आहे. 
      धारणी मध्यप्रदेश मार्गावर एन रस्त्याच्या मधात असलेला विद्युत खांबामुळे अनेकांचा अपघातात अंत झाला, मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नाही प्रशासनाने तात्काळ खांब काढण्यात यावे अन्यथा प्रशासन अन्य अपघाताची दुसऱ्या भीषण अपघाताची वाट पाहत आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे 

परतवाडा ते धारणी मध्य प्रदेश जाणाऱ्या आंतरराज्य मार्गावर मागील एक महिन्यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याला कारण म्हणजे याच मार्गावर एन रस्त्याच्या मधात असलेला विद्युत खांब मागील दोन महिन्याच्या कालावधीत अपघातात लोकांना आपले प्राण गमवावे लागले. परतवाडा मध्य प्रदेश मार्गावर मत रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब उभे असल्याने तोच खांब अडसर ठरत अपघाताची शृंखला घडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन विभाग द्वारे या रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. बुरळघाट जवळ घाट संपल्यानंतर रस्ते दिसत नाही दुहेरी वाहतूक असल्यामुळे येथे अपघात होतच आहे. रस्त्याच्या मधोमध उभे असलेले खांब तात्काळ काढण्याची मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!