LIVE STREAM

Crime NewsLatest News

मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके

किरकोळ वादातून हाणामारीच्या घटना नवीन नाहीत. मात्र, किरकोळ कारणातून उद्भवलेला वाद चक्क एका निष्पाप कामगाराच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलचे स्क्रीन गार्ड कमी दरात देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी मोबाईल दुकानातील एका कामगाराचा चाकू आणि कोयत्याने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना सांगली शहरात घडली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल. सांगली बस स्थानकाजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपीमध्ये ही खुनाची घटना घडली असून विपुल अमृत पुरी गोस्वामी असे खून झालेल्या दुकानातील कामगाराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही वेळातच आरोपींना अटक केली आहे.
मोबाईल दुकानात ग्राहक बनून आलेल्या हल्लेखोरांनी 100 रुपयांचे स्क्रीन गार्ड 50 रुपयांना मागितले होते. मात्र, दुकानातील कामगाराने ते 50 रुपयांत देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यातूनच 4 तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत दुकानातील कामगाराचा निर्घुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, त्यानंतर तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले. मात्र, विनाकारण क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद एका कुटुंबीयांवर मोठा दु:खाचा आघात देऊन गेला. घरातील कर्ता तरुण गेल्याने गोस्वामी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधिक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सांगली शहर पोलिसांनी काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!