“अमरावतीतील शौचालय योजनेत अनुदान कमी; नागरिकांमध्ये नाराजी, वाढीची मागणी”

अमरावती मनपाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालय योजनेचे अनुदान कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांचे आक्षेप आणि त्यासंबंधी निवेदन मनपा आयुक्त यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले.
“म.न.पा. अमरावती मार्फत २०२४-२५ मध्ये राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक शौचालय योजनेअंतर्गत अनुदान कमी झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. २०१४-१५ मध्ये या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान १७ हजार रुपये होते, पण आता ते १२ हजार रुपये करण्यात आले आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे, साहित्यांचे वाढलेले भाव आणि वाढत्या खर्चामुळे १२ हजार रुपयांत शौचालय बांधणे शक्य होत नाही. यामध्ये विटा, सिमेंट, वाळू आणि इतर बांधकाम साहित्य महाग झाले आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी या योजनेचा लाभ घेणे कठीण होत आहे. काही नागरिकांनी या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली असून, या अनुदानात वाढ केली जावी किंवा मनपाने शौचालय बांधकामाची जबाबदारी उचलावी अशी मागणी केली आहे. सामान्य जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधत, त्यांनी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, जर अनुदानात वाढ केली नाही, तर ही योजना त्वरित स्थगित करून नागरिकांची होणारी थट्टा थांबवावी. अशा पद्धतीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती मनपा आयुक्त यांना देण्यात आले.
निवेदनात दिलेल्या सूचनांनुसार, नागरिकांच्या हितासाठी सरकारला त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदानातून देण्यात आला आहे. अशाच सर्व अपडेट साठी बघत रहा सिटी न्यूज.