LIVE STREAM

Latest News

भाजपमध्ये कांटे की टक्कर, केजरीवाल, आतिशी आणि सिसोदिया पिछाडीवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दमदार विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलताना

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दमदार विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलताना दिसत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांचे निकटवर्तीय मनिष सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात जायंट किलर ठरले आहेत.

दिल्लीत भाजपची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजप ४८ जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी ३६ जागांची गरज आहे. केजरीवालांचा पराभव करत भाजपच्या प्रवेश वर्मांनी दिल्ली विधानसभेत मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे. त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

२००९ मध्ये प्रवेश वर्मा पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते. पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. २०१३ मध्ये पक्षानं त्यांना मेहरौलीतून विधानसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांनी आपच्या नरिंदर सिंह सेजवाल यांचा ४ हजार ५६४ मतांनी पराभव करत विधानसभा गाठली. २०१४ मध्ये त्यांनी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लढत तब्बल २ लाख ६८ हजार ५८६ मतांनी विक्रमी विजय मिळवला. २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा गाठली. त्यांनी ५ लाख ७८ हजार मतांनी विजय मिळवला.

दोनदा लोकसभा गाठणाऱ्या प्रवेश वर्मांनी आता १२ वर्षांनी विधानसभा गाठली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ते आघाडीवर आहेत. त्यामागे दोन महत्त्वाचे योगायोग आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून वर्मांनी बाजी मारली आहे. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून विजयी होणारी व्यक्ती दिल्लीचं नेतृत्त्व करते. २०१३, २०१५, २०२० मध्ये याच मतदारसंघातून निवडून आलेल्या केजरीवालांनी दिल्लीचं नेतृत्त्व केलं आहे.

केजरीवालांच्या आधी शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यादेखील २००८ मध्ये नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्याआधी त्या दोनदा गोल मार्केट विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. २००८ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली. गोल मार्केट मतदारसंघ नवी दिल्ली मतदारसंघ झाला. गोल मार्केटमधून विजयी झालेल्या असताना दीक्षित दोनवेळा मुख्यमंत्री झाल्या.

२०१३ मध्ये केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. केजरीवाल पहिल्याच निवडणुकीत जायंट किलर ठरले होते. आता तशीच किमया प्रवेश वर्मांनी केली आहे. त्यामुळे जाएंट किलर नेता पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी बसणार का, याची उत्सुकता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!