LIVE STREAM

Education NewsIndia NewsLatest News

पंतप्रधान मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद

10 फेब्रुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या विशेष कव्हरेजमध्ये वृत्त. आजच्या या कार्यक्रमात देशभरातील लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सहभागी झाले. दिल्लीतील भारत मंडपममध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लोकप्रिय ‘परीक्षा पे चर्चा’ 2025 कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी यंदा ३.३० कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी, तसेच २०.७१ लाख शिक्षकांनी नोंदणी केली होती. याचसोबत साडे पाच लाखांपेक्षा अधिक पालकही कार्यक्रमात सहभागी झाले.

पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य वेळेचे नियोजन आणि आरोग्याची काळजी घेण्याची महत्त्वाची टिप्स दिली. एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं, “समयाचे योग्य नियोजन करा आणि अतिरिक्त वेळ वाया घालवू नका. पुरेशी झोप आणि व्यवस्थित आहार घेणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे.”

याशिवाय, जेव्हा एक विद्यार्थी पालकांच्या अपेक्षांबद्दल प्रश्न विचारतो, तेव्हा पंतप्रधान मोदींनी सांगितले, “पालकांच्या अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत, पण मुलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन द्या. मुलांच्या क्षमतेनुसार त्यांना त्यांचे करिअर निवडू द्या. उदाहरण म्हणून सचिन तेंडूलकर यांचे कार्य दाखवले.”

कार्यक्रमात दीपिका पादुकोण, मेरी कोम, अवनी लेखरा, रुजुता दिवेकर, विक्रांत मॅसी, भूमी पेडणेकर, टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती देखील सहभागी होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवातून प्रेरित केले.

हा कार्यक्रम दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एक उत्सव बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने आयोजित केला जातो. यंदाचा हा आठवा ‘परीक्षा पे चर्चा’ होता आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.”

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा मंच बनला आहे, जिथे त्यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या शंकेचे निरसन आणि प्रेरणा प्राप्त केली. या संवादातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवल गेलं. परीक्षेमुळे मुलाण येणाऱ्या मानसिक तानावाला कमी करण्याचा उद्देश या चर्चा सत्राचा असतो. आम्ही आशा करतो की सर्व विद्यार्थी आगामी परीक्षेत चांगले परिणाम मिळवतील. सिटी न्यूजच्या वतीने सर्व विद्यार्थ्याना परीक्षेसाठी शुभेच्छा

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!