उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये अवैध संबंधांचा खुलासा, विवाहित पुरुष आणि प्रेयसीचे गळफास घेऊन आत्महत्या

उत्तर प्रदेश: अवैध संबंध उघडकीस आल्यामुळे, एका विवाहित पुरुषाने आपल्या प्रेयसीसोबत गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील झाशीमध्ये घडली आहे. एका विवाहित पुरुषाचे त्याच्याच मेहुण्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. जेव्हा कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या या अनैतिक प्रेमसंबंधाबद्दल कळले तेव्हा मोठा गोंधळ उडाला. दोघांनाही हे नाते संपवण्याचा सल्ला देण्यात आला. दोघांनीही याबद्दल कुटुंबीयांची माफी मागितली. ते आता एकमेकांशी बोलणार नाहीत असेही घरच्यांना सांगितले. पण रविवारी दोघांचेही मृतदेह जंगलातील एका झाडाला लटकलेले आढळले.
हे प्रकरण तारिचरकलन गावाचे असून मृत महिलेचे नाव आरती होते. आरतीचा नवरा धनेंद्र कुशवाह याने आरतीसोबत त्याचे लग्न फक्त ९ महिन्यांपूर्वी झाल्याचे सांगितले. लग्नानंतर काही काळाने ती फोनवर कोणाशी तरी गुपचूप बोलत असे. आणि जेव्हा तिला विचारणा करण्यात आली तेव्हा आरतीने सांगितले की ती धर्मेंद्र नावाच्या तरुणाशी बोलते. पण यानंतर आता ती धर्मेंद्रशी कधीच बोलणार नाही, असे आरतीने म्हटल्याचेही धनेंद्रने सांगितले.
दोघांनीही कान धरुन माफी मागितली.
आरतीचे पती धनेंद्र कुशवाहने पुढे सांगितले की, या गोष्टीला फक्त १५ दिवस झाले होते की त्यानंतर मला आरतीकडे दुसरा मोबाईल फोन सापडला. मला वाटलं होतं की ती अजूनही तिच्या बॉयफ्रेंड धर्मेंद्रशी बोलत असते. पण दरम्यान माझ्या बहिणीने मला सांगितले की आरतीचे इतर कोणाशी नाही तर माझ्याच भावोजींसोबत, प्लारेलाल कुशवाहा यांच्याशी प्रेमसंबंध आहेत. आम्ही त्यांना आमच्या घरी बोलावले. दोघांनाही समोरासमोर बसवण्यात आले. त्यांनी कान धरून आमच्यासमोर माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही असेही सांगितले. ही बातमी गावात पसरली. यामुळे आम्हाला खूप बाहेर पडायला लाज वाटू लागली.
७ दिवसांनी दोघांचेही मृतदेह सापडले
धनेंद्र म्हणाला की, माझ्या बहिणीचे लग्न ९ वर्षांपूर्वी प्यारेलालशी झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. पण माझ्या भावोजींनी माझ्याच पत्नीशी प्रेमसंबंध सुरू केले. २ फेब्रुवारी रोजी दोघेही अचानक घरातून गायब झाले. आम्ही दोघांना खूप शोधले. पोलिसात बेपत्ता व्यक्तींची तक्रारही दाखल करण्यात आली. ७ दिवसांनंतर, रविवारी, दोघांचेही मृतदेह जंगलातील एका झाडाला लटकलेले आढळले.
७ दिवसांनी दोघांचेही मृतदेह सापडले
धनेंद्र म्हणाला की, माझ्या बहिणीचे लग्न ९ वर्षांपूर्वी प्यारेलालशी झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. पण माझ्या भावोजींनी माझ्याच पत्नीशी प्रेमसंबंध सुरू केले. २ फेब्रुवारी रोजी दोघेही अचानक घरातून गायब झाले. आम्ही दोघांना खूप शोधले. पोलिसात बेपत्ता व्यक्तींची तक्रारही दाखल करण्यात आली. ७ दिवसांनंतर, रविवारी, दोघांचेही मृतदेह जंगलातील एका झाडाला लटकलेले आढळले.